
आंध्र प्रदेशातील गुंटूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राजधानी अमरावतीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंटूर मध्ये सोमवारी ही घटना घडली. पोलिसांनी जप्त केलेल्या ५० लाख रुपये किमतीच्या दारूच्या बाटल्या नष्ट करत असताना जमाव जमा होऊ लागला आणि ते दारूच्या बाटल्यांवर तुटून पडले, जसे मधमाशा मधाच्या पोळ्यावर तुटून पडतात.