
याआधीच्या पत्रकार परिषदेत देशमुख यांनी दावा केला की, फडणवीस यांनी कदम यांच्यामार्फत फोनद्वारे संवाद साधताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्याविरोधात प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगितले.प्रतिज्ञापत्रांवर स्वाक्षरी केल्या ईडी किंवा सीबीआय माझ्या मागे येणार नाही, असे मला सांगण्यात आले. माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मात्र, मला आयुष्यभर तुरुंगात जावे लागले तरी मी खोटे आरोप करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले. मी झुकलो नाही आणि म्हणूनच मला ईडी आणि सीबीआयला सामोरे जावा लागले.