
Poshan Aahar : सरकारकडून गर्भवती महिला, स्तनदा माता व लहान मुलांना अंगणवाडी मार्फत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. पोषण आहाराच्या धान्यात आळ्या, झुरळे, पाली निघण्याचे प्रकार आता नवीन राहिले नसून याला आळा घालण्यात प्रशासनाला अद्याप यश मिळालेले नाही. आता लातूर जिल्ह्यातील शिरुर तालुक्यामधील नागेवाडी गावात निकृष्टी दर्जाचा पोषण आहार वाटला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना असून एका महिलेने तर या धान्यापासून बनवलेले खिचडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी खाऊन दाखवावी, असे थेट चँलेंज दिले आहे.





