
Rahul Gandhi in IIT : काँग्रेसचे नेते व लोकसभेमधील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आयआयटी मद्रासला भेट देत तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना राहुल गांधी यांनी थेट उत्तरे दिली. यातील एका विद्यार्थ्याने राहुल गांधी यांना काँग्रेस व भाजपा कसे वेगळे आहेत? असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला देखील राहुल गांधी यांनी उत्तर दिलं. राहुल गांधी म्हणले, काँग्रेस निष्पक्षपातीपणे काम करते. तर भाजपा नेहमीच आक्रमक दृष्टीकोन ठेवून काम करतो. काँग्रेस पक्ष हा साधनसंपत्तीच्या समान वितरण आणि सर्वसमावेशक विकासावर विश्वास ठेवतो. तर भाजपाकडून आक्रमक रूपातील विकासावर लक्ष्य केंद्रित केलं जातं, असे गांधी म्हणाले.







