
कलर्स मराठी वाहिनीवर लवकरच ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ आणि ‘सुख कळले’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामधील ‘सुख कळले’ ही मालिका २२ एप्रिल पासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या मालिकेमुळे ‘रमा राघव’ मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजता करण्यात आली आहे. त्यामुळे आता एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे.






