
कोलकात्यात तीन महिलांच्या संशयास्पद हत्येबाबत नवनवीन खुलासे होत आहेत. आता पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, हे कुटुंब बऱ्याच काळापासून कर्जात बुडाले होते. त्यानंतरही कुटुंबाने आपल्या खर्चात कपात केली नाही आणि लक्झरी जीवन जगत राहिले. शेवटी कर्ज इतकं वाढलं की कुटुंबातील तीन महिलांची दोन भावांनी हत्या केली. पत्नींचा हत्या केल्यानंतर दोघे जण आत्महत्या करण्याच्या तयारीत होते, पण वाटेतच त्याच्या गाडीला अपघात झाला. पोलीस आल्यावर संपूर्ण प्रकार उघडकीस आला.