
‘आर्थिक निकषावर आरक्षण द्यावे, ही भूमिका मनसेच्या स्थापनेपासूनच आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, कारण राज्यात संधी उपलब्ध आहेत. पण त्या संधी बाहेरच्या मुलांना मिळतात, स्थानिकांना मिळत नाहीत. या संधीचा योग्य वापर झाला तर आरक्षणाची गरजच नाही. आंबेडकर, फुले, शाहू आर्थिक गरजूंना आरक्षण द्यावं या मताचे होते’, राज ठाकरे म्हणाले. यावर जरांगे पाटील म्हणाले की, ‘राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही. पण बाकीच्यांना हवे आहे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे, याचा राज ठाकरे यांनी विचार करायला पाहिजे. त्यांना जे वैभव मिळाले आहे, ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही.’