उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात रमले, शेतात झाडांची लागवड; विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

0
2


Eknath Shinde Farming at Dare Village  सातारा: विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीच काम नाही. मी कधीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा याचा मला अभिमान आहे. गावी आल्यानंतर झाडे लावण्याचा कार्यक्रम कायम मी करतो. ग्लोबल वार्मिंगचा फटका आपण खातोय. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. पर्यावरणाचे जतन करणे याची पुढील पिढीला चांगला मेसेज जाईल, यामुळे मी विरोधकांकडे लक्ष देत नाही. मी शेतीमध्ये काम करतो असतो त्यामुळे विरोधकांचे मन कुठे रमत नाही, माझे मन मात्र शेतात रमतं असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde Farming at Dare Village)

Eknath Shinde Satara : विरोधकांचे मन कुठे रमत नाही, माझे मन मात्र शेतात रमतं

राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत. या दरम्यान नागरिकांच्या भेटीबरोबरच ते शेतातही रमलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांनी अनेक वृक्षांची लागवड केली आहे. या भागात झाडांच्या रूपाने नवं नंदनवन केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. शेकडो अवाकडू झाडांची लागवड या ठिकाणी केली जात आहे. या भागात जी झाडे उगवत नाही ती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहे. त्यात सफरचंद, काजू, अवाकडू , चंदन, रक्तचंदन अशी अनेक झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहे. सर्व प्रकारचा भाजीपाला देखील या ठिकाणी आहे. ही जमीन देखील पोषक आहे.

Eknath Shinde at Satara : तरुणांनी मुंबईकडे न जाता इथेच थांबावा, यासाठी आमचा संकल्प

या ठिकाणचा तरुण मुंबईकडे न जाता इथेच थांबावा, यासाठी आमचा संकल्प आहे. यासाठी गटशेती, सेंद्रिय शेतीला आम्ही प्राधान्य देत आहोत. रासायनिक खते देखील आम्ही वापरत नाही. बांबूची लागवड ही या भागात मोठ्या प्रमाणात केली आहे. प्रतापगड, वासोटा किल्ला मकरंदगड अशा विविध गडांच्या पायथ्याशी आम्ही आहोत, यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला रात्री उशिरा सुद्धा दरेगावात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे शनिवार रात्रीपासून विश्रांतीसाठी दरे गावात मुक्कामी आहे. यावेळी नेते, पदाधिकारी यांची शिंदे यांना भेटण्यासाठी सकाळपासून रिघ होती. काल उशिरा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेरून आलेल्या आणि भागातील लोकांना भेटून समस्या जाणून घेतल्या. आज दुपारी ते दरे गावचा 2 दिवसाचा दौरा संपऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत.

आणखी वाचा

आणखी वाचा



Source link