इतक्या प्रमाणात पर्यटक असतानाही पोलीस कर्मचारी का नव्हते? पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचा सवाल

0
17
इतक्या प्रमाणात पर्यटक असतानाही पोलीस कर्मचारी का नव्हते? पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचा सवाल


Pahalgam terror attack : एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर अनेक प्रश्न विचारले आहेत. ज्या ठिकाणी इतके पर्यटक होते, तिथे एकही पोलिस किंवा सीआरपीएफ कॅम्प का नव्हता? रॅपिड रिस्पॉन्स टीमला घटनास्थळी पोहोचण्यास एक तासापेक्षा जास्त वेळ लागला. त्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारल्यानंतर गोळ्या घातल्या. ते पाकिस्तानातून आले होते आणि पाकिस्तान त्यांना पाठिंबा देतो. त्यांनी सीमा कशी ओलांडली? याला जबाबदार कोण? पहलगामला पोहोचले असेल तर ते श्रीनगरलाही पोहोचू शकले असते. उत्तरदायित्व निश्चित झाले तरच न्याय मिळेल. दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.



Source link