आले तुफान किती….जिद्द ना सोडली; ‘आई कुठे काय करते’मध्ये महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत अरुंधती मारणार बाजी

0
148
आले तुफान किती….जिद्द ना सोडली; ‘आई कुठे काय करते’मध्ये महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धेत अरुंधती मारणार बाजी


देशमुख कुटुंबाचा अविभाज्य भाग अर्थातच समृद्धी बंगल्यावर अनिरुद्ध आणि संजनाने हक्क दाखवला आहे. समृद्धी निवासाचा ताबा पुन्हा मिळवण्यासाठी अरुंधतीला पैश्यांची अत्यंत गरज होती. त्यामुळेच तिने महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेत मिहीर शर्मासोबत सहभाग घेतला. अनेक नवनवे पदार्थ तिने या स्पर्धेत करुन दाखवले. अनिरुद्ध आणि संजनासारखे प्रतिस्पर्धी असल्यावर विघ्न येणार हे काही नव्याने सांगायला नको. अरुंधतीच्या वाटेत असंख्य अडथळे आणण्याचं काम अनिरुद्ध आणि संजनाने केले. मात्र हे अडथळे पार करत अखेर अरुंधती महाराष्ट्राची सुगरण जोडी ही स्पर्धा जिंकणार आहे. अंतिम फेरीत अरुंधती आणि मिहिरने मिळून फणासाचं सांदण, अळुचं फतफतं आणि केळफुलाची भाजी असे पारंपरिक पदार्थ बनवले आहेत.
वाचा: ‘हापशीवर होणाऱ्या भांडणापेक्षा हे बेकार’, अभिनेत्याची सूरजला पाठिंबा देत नवी पोस्ट



Source link