
MoD Press Conference: आमचा लढा दहशतादाविरोधात होता, पण पाकिस्तानी लष्कराने दहशतवाद्यांना साथ देणं योग्य समजलं आणि या लढाईला आपली लढाई केली असं सांगत एअर मार्शल एके भारतींनी पाकिस्तानचा चेहरा जगासमोर उघड केला आहे. तिन्ही सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेत पाकिस्तानविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी प्रत्युत्तर कारवाई करणं गरजेचं होतं. जे नुकसान झालं त्यासाठी पाकिस्तानी लष्करच जबाबदार आहे असंही त्यांनी सांगितलं.
भारतीय सैन्य दलाकडून पत्रकार परिषद घेत ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात सध्या असणारी स्थिती आणि पाकिस्तानवर करण्यात आलेली माहिती देण्यात आली. यावेळी एअर मार्शल एक भारती यांनी सांगितलं की, “आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांविरोधात आहे. यामुळे आम्ही दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला होता. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांची साथ देणं योग्य समजलं. यामुळे पाकिस्तानने ही लढाई आपली लढाई बनवली आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं”.
#WATCH | Delhi | #OperationSindoor | Air Marshal AK Bharti says, “…It is a pity that the Pakistani military chose to intervene and that for terrorists, and hence we chose to respond…” pic.twitter.com/c3sHHKaRKI
— ANI (@ANI) May 12, 2025
पुढे ते म्हणाले की, आम्ही दहशतवादाविरोधात कारवाई केली. भारताची सुरक्षा यंत्रणा भेदणं अशक्य आहे. पाकिस्तानकडून डागण्यात आलेल्या चिनी मिसाईल्सपण अपयशी ठरल्या आहेत.
लेफ्टनंट जनरल राजीव घई य़ांनी यावेळी सांगितलं की, “आमच्या एअर डिफेन्स कारवाईला समजून घेण्याची गरज आहे. पहलगामपर्यंत यांचा पापाचा घडा भरला आहे. आम्ही आधीच तयारी केली होती आणि कारवाई करण्यात आली”.
#WATCH | Delhi | DGMO Lieutenant General Rajiv Ghai says, “In the last few years, the character of terrorist activities have changed. Innocent civilians were being attacked.. ‘Pahalgam tak paap ka ye ghada bhar chuka tha’…” pic.twitter.com/Nr21vVKSTo
— ANI (@ANI) May 12, 2025
लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले की, “ड्रोन आणि शस्त्रं नष्ट करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न अयशस्वी झाले आणि उर्वरित ड्रोन पाडण्यात आले. मला बीएसएफचेही कौतुक करायचे आहे. गस्त घालणारे जवान आमच्या मोहीमेत सहभागी झाले आणि शौर्य दाखवत आम्हाला साथ दिली.यामुळे पाकिस्तानच्या नापाक कारवाया उद्ध्वस्त झाल्या”.
व्हाइस अॅडमिरल एएन प्रमोद म्हणाले, “हवाई क्षेत्रासह सतत देखरेख स्थिर करण्यासाठी नौदलाचा वापर करण्यात आला. नौदल एकाच वेळी हवाई, भूपृष्ठ आणि भूपृष्ठावरील धोके शोधण्यात सक्षम होते. नौदल सतत देखरेख सुनिश्चित करण्यास सक्षम होते. अनेक सेन्सर्स आणि इनपुटचा प्रभावीपणे वापर करून आम्ही सतत देखरेख ठेवत आहोत. म्हणूनच आम्ही या धोक्यांना निष्प्रभ करू शकलो. आम्ही जास्तीत जास्त रडारचा वापर केला आणि सर्व उडणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं, मग ते ड्रोन असोत किंवा लढाऊ विमान असोत.”
#WATCH | Delhi: Vice Admiral AN Pramod says, “Effectively using multiple sensors and inputs, we are maintaining continuous surveillance to degrade or neutralise threats as they emerge or manifest to ensure targeting at extended ranges. All these are conducted under the umbrella… pic.twitter.com/emSuQ4TfFK
— ANI (@ANI) May 12, 2025
“आमचे वैमानिक आमच्या विमानांमध्ये दिवसरात्र काम करण्यास सक्षम आहेत. आपल्या हद्दीपासून काही किलोमीटर अंतरावरही शत्रूच्या कोणत्याही विमानाला येऊ दिलं नाही. कोणतंही विमान शेकडो किलोमीटर आत येऊ शकत नाही. आम्ही आमच्या क्षेपणास्त्रविरोधी आणि विमानविरोधी तंत्रज्ञानाची पडताळणी केली. आमचे शक्तिशाली युद्ध गट निर्भयपणे काम करण्यास सक्षम होते. यामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. त्यामुळे पाकिस्तानला सीमेजवळ राहण्यास भाग पाडलं गेलं,” असंही त्यांनी सांगितलं.
भारतीय नौदलाच्या वर्चस्वामुळे हे स्पष्ट झाले की, जर आपल्याला हवे असेल तर आपण आपल्या इच्छेनुसार हल्ला करू शकतो असंही ते म्हणाले. यानंतर एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, आमचे सर्व लष्करी तळ, उपकरणे आणि यंत्रणा कार्यरत आहेत आणि गरज पडल्यास कोणत्याही मोहिमेसाठी सज्ज आहेत.
विराट कोहलीचा उल्लेख
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, “आपल्या एअरफील्ड्स आणि लॉजिस्टिक्सला लक्ष्य करणे खूप कठीण आहे. विराट कोहलीने अलीकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, तो माझ्या आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. 1970 च्या दशकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील सामन्यादरम्यान, दोन ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेफ थॉमसन आणि डेनिस लिली यांनी इंग्लंडच्या फलंदाजीची लाइनअप उद्ध्वस्त केली. नंतर ऑस्ट्रेलियाने एक म्हण रचली होती की – “अॅशेस टू अॅशेस, डस्ट टू डस्ट, जर थॉमस नसेल तर लिली नक्कीच असेल.” जर तुम्ही लेअर पाहिल्या तर तुम्हाला मी काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहे ते समजेल. जरी तुम्ही सर्व लेअर ओलांडल्या तरी या ग्रिड सिस्टमचा एक थर तुमच्यावर नक्कीच परिणाम करेल,”