
धर्मवीर २ चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून राज्यात शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांना मारण्यात आले आहे. त्यांचा घातपात झाला, हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे, असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. तसेच त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी केल्याने निवडणुकीच्या तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.