
धर्मराव बाबा आत्राम यांनी त्या यात्रेत म्हटले की, माझ्या मुलीला नदीत फेकून देईन, ती मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होईल?असा सवाल त्यांनी करत आपला राग व्यक्त केला होता.यावर मेहबूब शेख म्हणाले, मुलगी सोडून जात असल्याचा त्यांना इतका राग अनावर झाला की, त्यांनी मुलाला नदीत फेकण्याची धमकी दिली. आत्राम साहेब तुमची मुलगी आहे, राग येणा साहजिक आहे. पण तुम्ही भाग्यश्री ताईला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तर तुम्हाला आता त्यांना नदीत फेकावे वाटले, इतका राग आला. पण, त्यावेळी तुमच्या स्टेजवर जे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार बसले होते. त्या अजित पवारांना त्यांच्या चुलत्यांनी वडिलांप्रमाणे सांभाळले. त्यांना तीनवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री केले, विरोधी पक्षनेता केले, अनेक वेळा आमदार केले, राज्यमंत्री केले १८ वर्षे अनेक पदे देऊन सोन्याचा चमचा तोंडात दिला. त्या अजितदादांनी स्वत:च्या काकाच्या पाठीत सूरा खूपसला, त्यांना कुठे फेकायचे हे पण सांगून टाका’, अशी घणाघाती टीका मेहबूब शेख यांनी अजित पवार यांच्यावर केली.