अजित पवार अपघाताने उपमुख्यमंत्री झालेत; त्यांनी भुजबळांना पुढं केलंय, जरांगे-पाटलांचा हल्लाबोल

0
19
अजित पवार अपघाताने उपमुख्यमंत्री झालेत; त्यांनी भुजबळांना पुढं केलंय, जरांगे-पाटलांचा हल्लाबोल


मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरची वेळ दिली होती. त्यानंतर सरकारने या मुद्द्यावर फेब्रवारीत विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली. मात्र आरक्षणासाठी फेब्रुवारीपर्यंत थांबणार नसल्याचे म्हणत जरांगे पाटलांनी मुंबईतील आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. २० जानेवारी रोजी मुंबईत तिसऱ्यांदा उपोषण आंदोलन होणार आहे. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलण्यासाठी छगन भुजबळांना अजित पवारांनीच पुढं केल्याचा आरोप केला आहे.



Source link