
यूपीच्या चंदौलीमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. इथं लग्नात चपाती देण्यास उशीर झाल्याने नवरदेव इतका संतापला की त्याने लग्नाला नकार दिला. इतकंच नाही तर लग्न मंडपातून पळून गेला अन् त्याच रात्री त्याने एका नातेवाईकाच्या दुसऱ्या मुलीशी लग्न केले. इकडे वधू हातात मेहंदी लावून वधूच्या पोशाखात त्याची वाट पाहत राहिली. जेव्हा तिला नवरदेव बेपत्ता झाल्याची बातमी कळली तेव्हा तिला खूप वाईट वाटले. पीडित वधूने बुधवारी पोलिसात धाव घेत एसपी आदित्य लंघे यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. एसपींच्या आदेशाने पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंमध्ये समेट घडवून आणली.