
ठरलं तर मग
‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता अर्जुन आणि सायली मधुभाऊंच्या केसमधील पुरावे शोधण्यासाठी एकत्र प्रयत्न करणार आहेत. मात्र, त्याआधी गेल्या आठवड्यात या मालिकेत चांगला ड्रामा पाहायला मिळाला. अर्जुनशी जवळील साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियाला सायलीने चांगलंच खडसावलं. तर, प्रियाची बाजू घेणाऱ्या पूर्णा आजीला देखील सायलीने चोख उत्तर दिलं. सायलीचा हा वेगळा अवतार पाहून अर्जुनच नाही, तर प्रेक्षकही खूप खुश झाले. या मालिकेने ६.९चा टीआरपी मिळवत पहिले स्थान कायम ठेवले आहे.