
सावनीने भरले आदित्यचे कान
आदित्य घरी जातो आणि सावनीला सांगतो की ती जो विचार करत होती तो चुकीचा होता. सागर सगळं सोडून आदित्यसोबत वेळ घालवत होता. सावनी या सगळ्यावर आदित्यला सांगते की तुझ्या सागर पप्पांना मुक्ताला घटस्फोट द्यायला सांग. मग आपण चौघे पुन्हा एकत्र राहू. तू, मी, सई आणि पप्पा. मी हवं तर हर्षवर्धनला सोडून देते. ते ऐकून आदित्या खूश होतो. आता आदित्य मालिकेत पुढे काय करणार हे येत्या भागात कळेल.






