साक्षीचं बिंग फुटणार! सायली आणि अर्जुन चैतन्यला वाचवू शकणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण

0
18
साक्षीचं बिंग फुटणार! सायली आणि अर्जुन चैतन्यला वाचवू शकणार? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण


मात्र, अर्जुनने या सगळ्यावर मौनच राखलं. दुसरीकडे अर्जुनच्याच वर्गातल्या एका मुलाने साक्षीला ओळखले. तो साक्षी आणि चैतन्यजवळ जाऊन तिला प्रश्न विचारू लागला की, तू कधी आमच्या कॉलेजला आली होतीस का? आपण या आधी पहिला कधी भेटलो आहोत का? त्याचे प्रश्न ऐकताच साक्षी चांगलीच गडबडली. ‘तुझा गैरसमज आहे. मी आधी कधीच इथे आले नव्हते’, असं म्हणत साक्षीनं त्या मुलाला टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सगळेजण पार्टी एन्जॉय करत होते. त्यावेळी सायली मानसीच्या जवळ जाऊन तिला काही प्रश्न विचारू लागली. सायलीने मानसीला विचारलं की, ‘तू इतकी सुंदर आहेस, मग इतकी वर्ष होऊनही तू अजूनही लग्न का केलं नाही?’ यावर मानसीने तिला उत्तर दिलं की, ‘मला माझ्या मनात असलेल्या मुलासारखा जोडीदार सापडलाच नाही, म्हणून मी अजूनही सिंगल आहे.’



Source link