- Marathi News
- Opinion
- Navneet Gurjar, Why Do Parties Tolerate Such Statements From Leaders? When It Comes To The Country, Its Security And The Army, We Should Be Beyond Politics…
नवनीत गुर्जर10 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
ऑपरेशन सिंदूरबाबत जगभरात जागरूकता निर्माणकरण्यासाठी सरकार विविध पक्षांचे वेगवेगळीशिष्टमंडळे पाठवत आहे. जवळजवळ सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचे हे गटपाकिस्तान सरकारने पोसलेल्या दहशतवादाचा पर्दाफाशकरतील आणि जगातील बहुतांश देशांसमोर पुराव्यांसहपाकिस्तानचा छुपा अजेंडा उघड करतील. ही सरकारची चांगली रणनीती आहे. याहूनही चांगली गोष्ट म्हणजे या शिष्टमंडळांमध्ये सर्वपक्षांच्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे जगभरात नक्कीच चांगला संदेश जाईल.
दुसरीकडे आपल्याच देशात सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचे काही नेते बेताल विधाने करण्यास चुकत नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना बाहेर काढण्याऐवजीत्यांचे पक्ष अप्रत्यक्षपणे त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्नकरत आहेत! मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा आणि उपमुख्यमंत्रीजगदीश देवाडा यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यापैकी एकाने कर्नल सोफिया कुरेशींबद्दल हास्यास्पदविधान केले, तर दुसऱ्याने म्हटले की, संपूर्ण सैन्यपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाशी नतमस्तक आहे! आता दिखाव्यासाठी या विधानांची चौकशीकरण्यासाठी एसआयटी स्थापन केली जात आहे.नक्कीच हे सर्व ढोंग आहे. जी विधाने केली गेली, ती सर्वांसमोर आहेत.यामध्ये एसआयटी स्थापन करण्याचाअर्थ काय? ती सारवासारव करण्याशिवाय दुसरे काय करू शकते? राजकीय पक्षांना अशी वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांना पोसण्याची सवय झाली आहे, असे दिसते. अशा लोकांवर कारवाई करण्याचे धाडस ते करूशकत नाहीत.
हे भाजप नेत्यांच्या विधानांबद्दल आहे. आता आपण काँग्रेस नेत्यांच्या विधानांकडे येऊया. ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे संपलेले नाही, असे लष्कराने म्हटल्यावरही राहुल गांधी कसे विचारू शकतात की, पाकिस्तानने आपली किती विमाने पाडली? पाडाली की नाही, हा वेगळा प्रश्न असू शकतो, पण असा प्रश्न या वेळी विचारला पाहिजे का? एकंदरीत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात, तुम्हालासर्वकाही जाणून घेण्याचा अधिकार आहे. पण, अशा प्रश्नांसाठी हा काळ योग्य आहे, असे म्हणता येणार नाही. आता राहुल गांधी हे स्वयंभू नेते आहेत, त्यांच्यावरकोण कारवाई करू शकेल? हे प्रकरण फक्त राहुल गांधींपुरते मर्यादित नाही. काँग्रेसअध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हेसुद्धा मागे नाहीत. ते म्हणतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पहलगाम किंवात्याच्या आसपास काही दहशतवादी कारवाया होणारअसल्याची माहिती मिळाली होती, म्हणून त्यांनी त्यांचादौरा रद्द केला. त्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांनी पहलगाममध्ये हत्याकांड घडले! आता माहिती मिळाल्यावरही प्रतिबंधात्मक उपाय केलेजाणार नाहीत हे कसे शक्य आहे? आणि पंतप्रधानांना हे कळल्यानंतर तर हे शक्यच नाही. विधान करताना खरगे साहेबांनी त्यांच्या बोलण्याचाअर्थ काय आहे याचा विचार करावा. हो, पहलगाम घटनेबद्दल तुम्ही म्हणू शकता की, हीसुरक्षेतील चूक असू शकते. इतके पर्यटक तिथे होते तर मग योग्य सुरक्षा व्यवस्थाका केली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जाऊशकतो. पण, माहिती असूनही काहीही केले नाही, असेम्हणणे योग्य नाही. दुसरीकडे, पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस पक्षानेऑपरेशन सिंदूरशी संबंधित शिष्टमंडळात कोण जावे वकोण जाऊ नये यावर वादळ निर्माण केले होते. अखेरमुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचेनाव अंतिम करण्यात आले.
इथे शिवसेनेत (उद्धव गटात)ही या विषयावर काहीकुजबुज सुरू होती. उद्धव ठाकरे यांनी शिष्टमंडळासाठी प्रियंका चतुर्वेदीयांचे नाव आधीच दिले होते आणि संजय राऊत यांना तेमाहीत नव्हते, हे समोर आले आहे! उद्धव सेनेत हे कदाचित पहिल्यांदाच घडले असावे. असो, एकंदर मुद्दा असा आहे की, राजकीय पक्षांनीपक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाबद्दल, त्याच्यासुरक्षेबद्दल आणि सैन्याबद्दल बोलले पाहिजे. या वेळी बऱ्याच प्रमाणात हे केले गेले, परंतु कोणत्या नाकोणत्या पक्षातील कोणी ना कोणी नेता विचारशून्य विधानेकरत राहिला. राजकीय पक्षांनी अशा नेत्यांना कडक इशारा द्यावाआणि त्यांची तोंडे बंद करावीत. तरीही ऐकत नसेल तर त्याला पक्षातून आणि पदांवरूनकाढून टाकावे. याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नसावा.





