
Tb patients Get one thousand Rupees : भारत सरकारने टीबी रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. रुग्णांना पुरेसे पोषण मिळावे आणि मृत्यूदर कमी व्हावा या उद्देशाने भारत सरकारने निक्षय पोषण योजनेच्या मदतीची रक्कम दरमहा एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णांना आता शासनाकडून दरमहा एक हजार रुपये पोषण भत्ता मिळणार आहे. यापूर्वी ऑक्टोबरपर्यंत रुग्णांना ५०० रुपये पोषण भत्ता मिळत होता. केंद्र सरकार टीबीमुक्त भारतासाठी मोहीम राबवत आहे. त्याअंतर्गत रुग्णांना पोषण भत्ता दिला जातो.








