
कशामुळे झाली चकमक? –
पीडीएफने भारतीय सीमेजवळील म्यानमारच्या चीन राज्यातील खावमवी आणि रिखावदार या दोन लष्करी स्थानांवर हल्ला केला होता. त्यानंतर पीडीएफ आणि म्यानमारच्या सैन्यामुळे चकमक झाली. पीडीएफने हल्ला केल्यानंतर म्यानमारच्या लष्कराने प्रत्युत्तर देत खावमावी आणि रिहखावदार गावांवर हवाई हल्ले केले. यामध्ये एका ५१ वर्षीय व्यक्तीचाही मृत्यू झाला. याशिवाय या हल्ल्यात पीडीएफमधील सुमारे ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. मिझोरामचे ६ जिल्हे चंफई, सियाहा, लांगतलाई, सेरछिप, हनाथियाल आणि सैतुअल म्यानमारच्या चीन राज्याच्या सीमा रेषेला लागून आहेत..








