
जगात सर्वात पवित्र नाते हे रक्ताचं मानलं जातं मात्र कधी कधी रक्ताच्या नात्याहूनही मैत्रीचं नातंश्रेष्ठ ठरतं. याची आपण अनेक उदाहरणे पाहिली आहेत. मैत्री म्हणजे ना कोणती औपचारिकता, ना नियम अन् ना कुठली बंधनं. त्यामुळे प्रत्येक सुख दु:खात धावून येणार मित्र हा नेहमी वणव्यामध्ये गारव्या सारखाच वाटतो. या मैत्रीची प्रचिती देणारी घटना लातूरमध्ये घडली आहे. दोन मित्रांच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकताच तिसऱ्यानेही आपला प्राण सोडला आहे.




