
Asaduddin owaisi on Mumbai : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालायनं फेटाळल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना मोठं विधान केलं आहे. ‘आता भाजपला कोणीही रोखू शकत नाही. मुंबई, चेन्नई, कोलकाता व हैदराबाद केंद्रशासित होण्याचा दिवस दूर नाही,’ असं त्यांनी म्हटलं आहे.








