
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना निर्माण झाली आहे. जशासतसं उत्तर दिल्याशिवाय पाकीस्तानची ही मस्ती उतरणार नाही अशी भावना व्यक्त केली जात आहे. जर आज भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर काय आहे भारताची तयारी याचा आढावा घेणारा एक रिपोर्ट पाहुयात.
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला जशासतसं उत्तर देण्याची भावना देशभरात जोर धरत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 27 निष्पाप पर्यंटकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे याचा बदला घेण्याची देशभरातून मागणी केली जात आहे. भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी सामर्थ्याचा जर विचार केला तर पाकिस्तान भारताच्या जवळपासही नाही. त्याचा अंदाज भारत आणि पाकच्या लष्करी सामर्थ्याची तुलना केल्यानंतर आपल्याला येऊ शकेल.
कुणाचं लष्करी सामर्थ्य मोठं?
जागतिक मिलिटरी रँकिंग (SB)
– भारत – चौथ्या स्थानी
– पाकिस्तान – बाराव्या स्थानी
भारत
सैन्यबळ – 14 लाख 55 हजार 550
पाकिस्तान
सैन्यबळ – 6 लाख 64 हजार
भारत
रणगाडे – 4 हजार 614
पाकिस्तान
रणगाडे – 3 हजार 742
हवाईदल (SB)
भारत
एअरक्राफ्ट – 2 हजार 229
पाकिस्तान
एअरक्राफ्ट – 1 हजार 399
हवाईदल (SB)
भारत
जेट्स – 513
पाकिस्तान
जेट्स – 328
हवाईदल (SB)
भारत
हवाई टँकर – 6
पाकिस्तान
हवाई टँकर – 4
नौदल (SH)
भारत
युद्धनौका – 293
पाकिस्तान
युद्धनौका – 121
लष्कराच्या तीनही दलांचा आपण तुलनात्मक विचार केला तरीही भारताच्या आसपासही पाकिस्तान नसल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही पाकिस्तानची कुरापती करण्याची सवय काही जात नाही. त्यामुळे पाकिस्तानला धूर चारण्याच्या भावना देशविसियांमध्ये तीव्र झाले.