
देशाचे माजी पंतप्रधान व आर्थिक सुधारणांचे जनक डॉ. मनमोहन सिंग यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. सिंग यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवठा जाहीर करण्यात आला आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांच्या स्मारकाच्या जागेवरून काँग्रेस व सत्ताधारी भाजपमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यातच आता नव्या मुद्यावरून वाद निर्माण झाला आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात शोकाचं वातावरण असतानाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी नववर्ष साजरं करण्यासाठी व्हिएतनामला गेल्याचा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला आहे.