
अचानक त्यांचे निधन झाले.
सतीश कौशिक यांचा पुतण्या निशांतने सतीश कौशिक यांच्या शेवटच्या इच्छेविषयी सांगितले होते. काकांची इच्छा होती की त्यांच्या जीवनावरील ऑटोबायोग्राफी लिहिली जावी. हरियाणा पासून ते मुंबई पर्यंतचा त्यांचा प्रवास या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांना दाखवायचा होता. त्यांचा अनुभव त्यांना इतरांसोबत शेअर करण्याची इच्छा होती. त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व किस्से पुस्तकाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगायचे होते. ते स्वत: या पुस्तकावर काम करणार होते. त्यांना जेव्हा वेळ मिळत असे तेव्हा ते लिखाण करत असत. आता त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली आहे.