
संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर म्हटलं की, अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्रीपदाचा फार्म्युला ठरला होता, तर नक्कीच ठरला होता. मात्र ज्यांच्याकडे १०५ आमदार होते, त्यांचा तो सन्मान होता. त्यामुळे आधी भाजप अडीच आणि नंतर शिवसेना अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद घेणार होतं. मात्र त्यांना उद्धव ठाकरे यांना युती करायचीच नव्हती. भाजपने मातोश्रीवर ऑफर पाठवली होती. मात्र उद्धव ठाकरेंना शिंदे विचारायला गेले तेव्हा मी बोलणी करणार नाही, तुम्हाला करायची तर करा, असे त्यांनी म्हटले. कारण तोपर्यंत पवारांनी ठाकरेंना ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला आहे.