
टीम इंडिया फिरकीपटू आर. अश्विन. ( संग्रहित छायाचित्र)
पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडिया फिरकीपटू आर. अश्विन आज (दि.१८) पुन्हा एकदा संघात सहभागी होण्यासाठी राजकोटमध्ये परतला आहे. आई आजारी असल्यामुळे राजकोट कसोटीच्या तिसर्या दिवशी तो घरी गेला होता. यानंतर टीम इंडिया १० खेळाडूंसह मैदानात उतरले होते. ( R Ashwin returns to Rajkot, to rejoin team on Day Four )
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आज स्पष्ट केले की, कौटुंबिक आपत्कालीन परिस्थितीत अश्विनला तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसानंतर संघातून तात्पुरते माघार घ्यावी लागली होती. अल्पकाळाच्या अनुपस्थितीनंतर अश्विनचे संघात पुनरागमन केल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. तो चौथ्या दिवशी पुनरागमन करेल आणि कसोटी सामन्यात संघासाठी योगदान देत राहील.
राजकोट कसोटीतील दोन दिवसांच्या खेळानंतर आई आजारी असल्याने अश्विनला घरी जावे लागले होते. आम्ही कुटुंबाचे महत्त्व प्राधान्याने मान्य केले आहे. या आव्हानात्मक काळात अश्विनच्या समर्थनार्थ संघ आणि त्याचे समर्थक एकजुटीने उभे राहिले आहेत आणि व्यवस्थापनाला त्याचे मैदानात परत स्वागत करताना आनंद होत आहे, असेही ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे. ( R Ashwin returns to Rajkot, to rejoin team on Day Four )
🚨 UPDATE 🚨: R Ashwin set to rejoin #TeamIndia from Day 4 of the 3rd India-England Test.#INDvENG | @IDFCFIRSTBankhttps://t.co/rU4Bskzqig
— BCCI (@BCCI) February 18, 2024







