
जम्मू काश्मीर विधानसभा अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी राज्यात कलम ३७० पुन्हा लागू करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आमदारांचा विरोधात असतानाही उपमुख्यमंत्री सुरिंदर कुमार चौधरी यांनी हा ठराव विधानसभेत मांडला. या ठरावाला सत्ताधारी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याने ठराव मंजूर करण्यात आला.