
सध्या संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान आज सुरु झाले आहे. तर, दुसरीकडे प्रचाराचा देखील धुरळा उडताना दिसत आहे. गेल्या काही वर्षात राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण आले आहे. राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले आहेत. पण बंडखोरी करणाऱ्या पक्षाकडे चिन्ह आणि नाव गेल्याचे दिसत आहे. आता मराठमोळे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी सध्या देशात आणि राज्यात सुरु असलेल्या राजकारणावर स्पष्टच मत मांडले आहे. त्यांनी ‘आम्हा मतदारांची फसवणूक झाल्यासारखं आहे’ असे म्हटले आहे.








