
Double Murder Case: अनैतिक संबंधांचा शेवट हा नेहमी वाईटच होतो, हे पुन्हा एकदा दिसून आलंय. एका मुलाने आपल्या आईला नको त्या अवस्थेत तिच्या बॉयफ्रेण्डसोबत पाहीलं. यानंतर त्याला राग अनावर झाला. या रागाच्या भरात ते जे केलं. ते फारच भयानक होतं. सिरसा येथील सिकंदरपूर थेडी येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडालीय. एका मुलाने त्याच्या आई आणि तिच्या प्रियकराची अनैतिक संबंधांमुळे गळा दाबून हत्या केली. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात एका तरुणाने आपल्या आई आणि तिच्या प्रियकराची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली, तर शुक्रवारी सकाळी आरोपी स्वतः मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाला. लेखचंद हा गावातीलच शेजारी होता. आई-प्रियकराचे अवैध संबंध मुलाला मान्य नव्हते. अनेकदा वाद झाले, पण शेवटी त्याने दोघांनाही संपवलं आणि पोलिसांसमोर हजर झाला.
नेमकं काय घडलं?
एका 20-22 वर्षांच्या तरुणाने आपल्या आई अंगूरी देवी (वय अंदाजे 50) आणि तिच्या प्रियकर लेखचंद (वय अंदाजे 50) यांचा गळा दाबून खून केला. दोघांचेही अनैतिक संबंध असल्याचे त्याच्या निदर्शनास आले होते. याचा राग त्याच्या मनात होता. गुरुवारी रात्री सुमारे 2 वाजता सिकंदरपूर थेडी गावात हत्या झाली. शुक्रवारी सकाळी आरोपी स्वतः पिकअप ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह घेऊन सिरसा शहरातील सदर पोलिस ठाण्यात पोहोचला.
आरोपीने काय सांगितलं?
त्याने पोलिसांना सांगितलं की, “मी अनेकदा आईला समजावलं, पण ती ऐकली नाही. त्यामुळे मी प्रथम लेखचंदचा आणि नंतर आईचा गळा दाबला.” हत्येनंतर तो थेट पोलिस स्टेशनला गेला आणि शरण आला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन सिरसा सिव्हिल हॉस्पिटलच्या शवागारात पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
FAQ
प्रकरण कधी आणि कुठे घडले?
उत्तर: ही घटना २७ नोव्हेंबर २०२५ च्या रात्री सुमारे २ वाजता हरियाणातील सिरसा जिल्ह्यातील सिकंदरपूर थेडी गावात घडली. आरोपी दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ नोव्हेंबरला सकाळी दोन्ही मृतदेह घेऊन सिरसा शहरातील सदर पोलिस ठाण्यात हजर झाला.
खून कोणी आणि का केला?
उत्तर: २०-२२ वर्षांच्या तरुणाने (मयत महिलेचा मुलगा) आपल्या आई अंगूरी देवी (वय अंदाजे ५०) आणि तिच्या प्रियकर लेखचंद (वय अंदाजे ५०) यांचा गळा दाबून खून केला. आईचे लेखचंदबरोबर अवैध संबंध होते आणि त्याला ते मान्य नव्हते, म्हणून त्याने हा दुहेरी खून केला.
आरोपीने पोलिसांना काय सांगितले?
उत्तर: आरोपीने पोलिसांना सांगितले की, “मी अनेकदा आईला समजावले, पण ती ऐकली नाही. त्यामुळे मी प्रथम लेखचंदचा आणि नंतर आईचाही गळा दाबला.” खून केल्यानंतर तो स्वतः पिकअप ट्रकमध्ये दोन्ही मृतदेह घेऊन पोलिस ठाण्यात शरणाला गेला.







