अजितदादांनी आयुष्यभर जी गोष्ट जीवापाड जपली तोच वसा सुनेत्रा वहिनी पुढे नेणार, कराडमध्

0
6


Sunetra Pawar at Satara: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजकीय आयुष्यात कायम शीर्षस्थानी राहिलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वसा आता त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याकडून पुढे चालवला जाताना दिसत आहे. सुनेत्रा पवार या सोमवारी सातारा आणि फलटणचा (Phaltan news) दौरा करणार आहेत. यावेळी सुनेत्रा पवार कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीची दर्शन घेतील. अजित पवार यांच्या राजकीय जीवनात यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ आणि त्यांचे विचार नेहमीच महत्त्वाचे राहिले. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अनेकदा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी कराडच्या प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. आपल्या भाषणांमधून ते अनेकदा आपले राजकारण आणि समाजकारण हे यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीचे असल्याचे सांगायचे. त्यांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारही हाच वसा पुढे नेताना दिसत आहेत. 

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत.  सकाळी 10  वाजता कराड येथील प्रितीसंगम बाग येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळी जाऊन पुष्पमाला अर्पण करत त्यांना आदरांजली वाहतील.  यानंतर दुपारी 11  वाजता उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार मोटारीने फलटणकडे रवाना होतील. दुपारी 1 वाजता त्या कै. विदीप जाधव यांच्या निवासस्थानी (लोणंद, तरडगाव, ता. फलटण) कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली व त्यांच्या दुःखात सहभागी होणार आहेत. अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला तेव्हा सुरक्षारक्षक विदीप जाधव हे त्यांच्यासोबत विमानात होते. विमान कोसळल्यानंतर विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला होता. कालच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी रोहित पवार यांनी विदीप जाधव यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आज सुनेत्रा पवार या विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत. यानंतर सुनेत्रा पवार पुन्हा बारामतीत परतणार आहेत. 

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री

अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारीला बारामती येथे अपघात झाला होता. विमान खाली कोसळल्यानंतर प्रचंड स्फोट होऊन अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्राच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्नायकी परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या निधनाच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 31 जानेवारीला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. अजित पवार यांच्याकडील अर्थ खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आले नसले तरी क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्याक विकास या तीन खात्यांचे मंत्रीपद सुनेत्रा पवार यांना देण्यात आले होते. 

आणखी वाचा

विमान अपघातावेळी ‘धुकं नव्हतं तर तिथं धोका’ होता, अजितदादांचा 100 टक्के घात झालाय; आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केली शंका, म्हणाले, जोपर्यंत..

आणखी वाचा



Source link