
Mumbai Boat Capsized News: मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ बुधवारी नौदलाची स्पीड बोट धडकल्याने प्रवाशी बस समुद्रात उलटली. या दुर्घनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बोट गेट ऑफ इंडियाहून एलिफंटा बेटापर्यंत प्रवाशांना घेऊन जात असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. पंरतु, तुम्हाला माहिती आहे का? मुंबईमध्ये ७८ वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती, जेव्हा ६०० पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले. ही घटना मुंबईत घडलेल्या मोठ्या दुर्घटनापैकी एक आहे.