
देशमुख आधी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनात त्यांनी अनेक पदावर काम केले आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शिवसेनेत असताना शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक आंदोलने करुन शिवसेना पक्ष वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न केले होते. देशमुख हे स्वगृही परतल्याने शिवसैनिकामध्ये नवचैतन्य संचारले आहे.





