
Rahul Gandhi news : हरयाणा व जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू-काश्मीर व हरयाणाच्या जनतेचे त्यांनी आभार मानले आहेत. त्याचवेळी, हरयाणातील अनेक मतदारसंघांतून आलेल्या तक्रारींची माहिती निवडणूक आयोगाला दिली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे.