
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शेतकरी आंदोलनासंदर्भात थेट केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. मंगळवारी त्यांनी कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांना थेट प्रश्न विचारला की, शेतकऱ्यांना लेखी दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? त्यांनी एक लांबलचक भाषण केले आहे, ज्याचे अनेक अंश सोशल मीडियावर ही शेअर करण्यात आले आहेत. उपराष्ट्रपती म्हणाले, “कृषिमंत्री महोदय, तुमच्यासाठी प्रत्येक क्षण जड आहे. मी तुम्हाला विनंती करतो की, कृपया मला सांगा, शेतकऱ्याला वचन दिले होते का? आश्वासन का पाळले गेले नाही? आम्ही आमची वचने पाळण्यासाठी काय करत आहात?”