तामिळनाडूमध्ये प्रादेशिक राजकारणाचा एक अध्यायसुरू होणार आहे. त्याचा राष्ट्रीय राजकारणावर परिणामहोईल. तज्ञांनुसार दशकांनंतर तमिळनाडूत त्रिकोणीयस्पर्धा होऊ शकते. यावेळी त्रिशंकू विधानसभेची शक्यताआणखी आश्चर्यकारक आहे. दक्षिण भारतातील यामहत्त्वाच्या राज्यात राजकारणातील मूलभूत गोष्टी बदलतआहेत. यावेळी निवडणुका केवळ हिंदी विरुद्ध तमिळआणि उत्तर विरुद्ध दक्षिण या बद्दल नाहीत. या निवडणुकाकेवळ तमिळ संस्कृतीचे रक्षण करण्याबद्दल नसतील. त्यातमिळनाडूचे स्वरूप बदलण्याबद्दल देखील असतील. याखेळात पत्ते अद्याप पूर्णपणे उघड झालेले नाहीत. परंतु हामुकाबला खूप मनोरंजक ठरला आहे. विधानसभेतील 234 जागांपैकी 133 जागा सत्ताधारीद्रमुककडे आहेत. इतर सर्व पक्ष द्रमुकचे मुख्यमंत्री एमकेस्टॅलिन यांच्याविरुद्ध युती करत आहेत. त्यामुळे यानिवडणुकीत द्रमुकचा पूर्णपणे पराभव करण्याचे आव्हानत्यांच्यासाठी आहे. अनेक वर्षांपासून तामिळनाडूत द्रमुकविरुद्ध अण्णा द्रमुक उभे राहिले आहे आणि मुकाबलानेहमीच या दोन द्रविड पक्षांत राहिला आहे. व्यक्ती पूजेचेराजकारण हे तामिळनाडूचे वैशिष्ट्य राहिले आहे.अण्णादुराई, एमजी रामचंद्रन, करुणानिधी आणिजयललिता यासारख्या महान व्यक्तींना तमिळ लोकांनीअवर्णनीय आदराने स्वीकारले होते. पण आजतामिळनाडूमध्ये त्यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याची कमतरताआहे. पक्षाच्या पलीकडे जाणारा आणि तमिळ संस्कृतीचाएक शक्तिशाली रक्षक असलेल्या नेत्याची कमतरताआहे. विशेषतः जयललिता यांच्या निधनानंतर अण्णाद्रमुककडे आता त्यांच्या दर्जाचा नेता राहिलेला नाही.पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेद वाढले आहेत. यामुळे ते द्रमुकविरोधी भावनांचा पूर्णपणे फायदा घेऊ शकत नाही. द्रविड भूमीत आपली मुळे रुजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपकडे ना करिष्माई नेता आहे ना द्रविड रणनीतीसमजून घेणारा तमिळ भाषिक तज्ञ. कदाचित भाजपलापक्ष व विचारसरणीपेक्षा मोठे स्थान असलेल्या व्यक्तिमत्त्वाची गरज नसेल. भाजप ही निवडणूक एकाच उद्दिष्टाने लढत आहे : काहीही झाले तरी द्रमुकचा पराभव करणे. तामिळनाडूमध्ये काँग्रेस पूर्णपणे द्रमुकच्यासावलीत वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनाफक्त नऊ जागा मिळाल्या. द्रमुक तामिळनाडूमध्ये हरलातर केंद्रात काँग्रेसची स्थिती सध्याच्यापेक्षा अधिककमकुवत होईल. द्रमुकचे लोकसभेत 22 खासदार आहेत.ते प्रत्येक मुद्द्यावर मोदी सरकारचा तीव्र विरोध करतात. आज देशात भाजपविरोधी दोन मजबूत बालेकिल्लेआहेत: बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूमध्ये स्टालिन. तामिळनाडूमध्ये भाजप संघटनेत द्रमुकचीबरोबरी करणारा नेता नाही. हे देखील खरे आहे की 2026च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुका भाजपच्या नेतृत्वाखालील निवडणुका नाहीत. या निवडणुकीतअमित शाह हे मुख्य रणनीतीकार आहेत. त्यांनाद्रमुकविरुद्ध प्रभावी युती करण्यात काही प्रमाणात यश मिळाले आहे. एप्रिल 2024 मध्ये भाजप आणि अण्णाद्रमुकने तामिळनाडू निवडणूक लढवण्यासाठी युती केली.गेल्या तीन महिन्यांत अमित शाह आणि प्रभारी पियुषगोयल यांनी गौंडर आणि वाणीयार जातींना एनडीएमध्येसामील होण्यासाठी राजी केले आहे. दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून द्रमुकचा प्रचार प्रामुख्याने भाजपच्याविचारसरणीविरुद्ध आहे. भविष्य लक्षात घेऊन स्टॅलिनयांनी त्यांचा मुलगा उदयनिधी यांना प्रोत्साहन दिले आहे.आज उदयनिधी हे द्रमुकच्या भाजपविरोधी राजकारणाचेमुख्य प्रचारक आहेत. स्टॅलिन अनेक संकटांनी वेढलेलेआहेत. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, त्यांचा मुलगाउदयनिधी यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवण्याचा त्यांचादृढनिश्चय व राज्यातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्थेचीपरिस्थिती यामुळे द्रमुकच्या विरोधाचे वातावरण निर्माणहोत आहे. बदलत्या जमिनीवरील वास्तवामुळे एकेकाळीद्रमुकचा सहकारी असलेला काँग्रेसही द्रमुकपासून वेगळेनिवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. परंतु तसेहोण्याची शक्यता कमी आहे. पण तामिळनाडूच्यानिवडणुका अभूतपूर्व होणार असतील तर त्या स्टॅलिनकिंवा विरोधी पक्षनेते पलानीस्वामी (ईपीएस) यांच्यामुळेनाहीत. खरे तर तमिळ सुपरस्टार विजय यांनी सर्वांनाचप्रभावित केले आहे. अनेक सर्वेक्षणांमध्ये सुमारे 25%मतदारांमध्ये विजयला पाठिंबा असल्याचे दिसून आलेआहे. हे लोक विजयच्या टीव्हीके (तामिळनाडू वेत्रीकझगम) पक्षाला मतदान करत असले तरीनिवडणुकीच्या निकालांचा अंदाज कोणीही लावू शकतनाही. विजय काँग्रेससोबत आल्यास द्रमुकला 20 जागाहीमिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल, असा अंदाजबांधणारे लोकही काँग्रेसमध्ये आहेत. पण विजयलाकोणीही सहजासहजी घेणार नाही. त्याच्याकडे प्रचंडआत्मविश्वास आणि भरपूर पैसा आहे. तो आजचा सर्वातलोकप्रिय सुपरस्टार आहे. तो इतर पक्षाच्या नेत्यांना सहजभेटत नाही आणि घटनांवर तो लवकर प्रतिक्रिया देतनाही. संपूर्ण तामिळनाडूमध्ये त्याच्याकडे उभे करण्यासाठीपुरेसे उमेदवार नाहीत. परंतु बिघडत्या परिस्थितीमुळे लोकइतके संतापले आहेत की ते विजयवर आशा ठेवत आहेत.विजयला दलित, महिला आणि तरुणांचा पाठिंबा आहे. खरे तर, लोक दोन्ही द्रविड पक्षांना इतके कंटाळले आहेतकी द्रमुकच्या विरोधात असणारी निवडणूक मतदानाच्यादिवशी विजयसाठी अनुकूल निवडणुकीत रूपांतरितझाली तर आश्चर्य वाटणार नाही. भाजपविरुद्ध कोणतेहीमहत्त्वाचे विधान न केल्याबद्दल द्रमुक नेते विजयवरजोरदार टीका करतात. सेन्सॉर बोर्डाने त्यांचा महागडाचित्रपट ब्लॉक केला आहे. तरीही, ते भाजपविरुद्ध बोलण्यात अपयशी ठरले. यामुळेभाजप द्रमुकविरुद्ध युक्ती खेळत असल्याच्या अफवांनाबळकटी मिळाली आहे. सध्या सुरू असलेले सर्वेक्षणसर्वांना गोंधळात टाकण्यासाठी पुरेसे आहेत. तज्ज्ञांनुसारविजय द्रमुक आणि अण्णा द्रमुक दोघांचेही नुकसानहोईल. अशा परिस्थितीत द्रमुक निवडणूक जिंकण्याचासर्वतोपरी प्रयत्न करेल. अगदी थोड्या फरकानेही. कारणविजयच्या प्रवेशामुळे द्रमुकविरोधी मते फुटण्याची शक्यताआहे. दरम्यान, भाजप तामिळनाडूमध्ये त्रिशंकूविधानसभा निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यात तेएनडीएमध्ये सरकार स्थापन करण्यात किंवा चालवण्यातभूमिका बजावू शकेल. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे) द्रविड राजकारणात एक नवीनत्रिकोणीय संघर्ष उदयासगेल्या अनेक वर्षांपासून तामिळनाडूत द्रमुकआणि अण्णाद्रमुक मैदानात आहे. हामुकाबला सामान्यपणे दोन द्रविड पक्षांतअसतो. आज त्यांच्याकडे लोकप्रिय नेतानाही. विजय त्यांच्यासमोर कठीण आव्हानउभे करत आहेत. भाजप- काँग्रेस यासमीकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Source link





