
Moneyedge Group : मुंबईत टोरेस कंपनीने लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याची घटना ताजी असताच आता मनीएज नावाच्या कंपनीने देखील सर्वसामान्य गुंतवणूकदारांना हजारो कोटी रुपयांना चूना लावल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या मनीएज घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीची मालमत्ता जप्त केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने रायगडमधील १६ एकरांच्या चार भूखंडांसह ठाणे, विरारमधील ८ फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, १७ बँक खातीही गोठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.