
महावितरणच्या भोंगळ कारभाराची अनेक उदाहरणे समोर येत असतात. घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकाला लाखोंच्या घरात वीज बिले पाठवल्याचे प्रकार आपण याआधी पाहिले आहेत. आता सातारा जिल्ह्यात असाच प्रकार समोर आला आहे. विजेचे कनेक्शन नाही, त्यामुळे वीज अगदी शुन्य वापर, तरीही शेतक-याला तब्बल ९ हजार आठशे पन्नास रुपयांचे बिल पाठवले आहे. बिल हातात पडताच शेतकरी कुटुंबासमोठा धक्का बसला आहे. कराड तालुक्यातील नांदगाव येथेहा प्रकार घडला आहे.






