
स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘वीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवत आहात. हे मान्य करता येणार नाही आणि भविष्यातही असे घडले तर आम्ही स्वत:हून दखल घेऊ, असेही ते म्हणाले. इतकेच नव्हे तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारले की, महात्मा गांधी देखील आपल्या पत्रात स्वत:ला इंग्रजांचा सेवक म्हणून लिहित असत हे तुमच्या क्लायंटला माहित आहे का?






