
शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये निवडणुकीचा उल्लेख केलेला नाही. पण, ही पोस्ट वाचताच अनेकांनी ती निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर असल्याचं म्हटलं आहे. तसेच, यावर कमेंट करताना देखील निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर केल्या गेल्या आहेत. शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वक्तव्य लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वाक्य पुन्हा खरं ठरलं. मला मुस्लिमांची, ख्रिश्चनांची भीती वाटत नाही. मला हिंदूंची भीती वाटते कारण हिंदूच हिंदुत्वाच्या विरोधात उभे ठाकतात.’ शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सोशल मीडियावर येतात व्हायरल झाली आहे. अनेक नेटकरी या पोस्टवर कमेंट्स करताना दिसत आहेत. कमेंटच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी देखील आपापली मतं व्यक्त केली आहेत.








