
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने असे काही सांगितले, ज्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, करण कुंद्रा आणि त्याची ‘लव्ह अधुरा’मधील सहकलाकार एरिका फर्नांडिस यांना एकमेकांसाठी मॅट्रिमोनी प्रोफाइल लिहिण्यास सांगण्यात आले होते. यावेळी एरिकाने करणची मस्करी करताना म्हटले की, करणला कधीच लग्न करायचे नव्हते. याला प्रत्युत्तर देताना करण कुंद्रा म्हणाला की, काळ बदलायला वेळ लागत नाही.








