
एका सोशल मीडिया वापरकर्त्याने लिहिले आहे की, लोक रील बनवण्याच्या नादात आपले आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, हे लोक का समजू शकत नाहीत. दुसऱ्याने कमेंट करताना असे म्हटले आहे की, हे जगाचे सत्य आहे, आता इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स आता उपयोगी येणार नाहीत, फक्त आई-वडीलच तिची काळजी घेतील. आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘रीलच्या नावाखाली आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना जेव्हा आपण समजावून सांगतो, तेव्हा ते आपल्याला ज्ञान देण्यास सुरुवात करतात आणि मग असे अपघात समोर येत राहतात.’ एकाने म्हटले आहे की, ‘अशा घटना वाढत आहेत आणि लोकांना जीव गमवावा लागत आहे, सरकारने याबाबत गांभीर्याने विचार करावा.’








