
तरुणांमध्ये व्यसनाधीनता व त्यातून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. जालन्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुटख्याच्या पुडीसाठी झालेल्या वादातून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. मित्रानेच त्याचा चाकूने भोसकून खून केला. जालना शहराच्या जवळच असलेल्या पीर पिंपळगाव शिवारात ही घटना घडली.






