
तर, पूर्णा आजी रडून रडून आपली प्रतिमा गेल्याचं दुःख व्यक्त करणार आहे. दुसरीकडे, आजी आता आपल्याला तन्वीला भेटायचं आहे असं म्हणणार आहे. नंतर सगळे सुभेदार रविराज किल्लेदार यांना घेऊन त्यांच्या घरी जायला निघणार आहेत. इथे रविराज किल्लेदार यांच्या घरात खोटी तन्वी म्हणून राहत असलेली प्रिया आपला प्लॅन सक्सेस झाला की नाही, याचाच विचार करत असते. बाहेर गेलेला रविराज अजून कसा घरी परत आला नाही या विचारात असताना, ती मनात पुढचा प्लॅन आखत असते. तुझ्या खऱ्या बायकोसाठी ही खोटी मुलगी रडण्याचा नाटक नक्कीच करेल, असं ती मनाशी म्हणत असते. इतक्यात तिथे नागराज येतो. तो देखील रविराजच्या परत येण्याची वाट बघत असतो.







