
Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीसह दोन चिमुकल्यांवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत दोन चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी या हल्ल्यातून थोडक्यात बचावली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना चोपडा तालुक्यात गौऱ्यापाडा येथे मध्य प्रदेशच्या सीमेवरील देवळी गावी घडली.







