
पती-पत्नीच्या भांडणाचा फटका भारतीय रेल्वेला बसला असून कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. पती-पत्नीमधील घरातील भांडण घराबाहेर पडल्यावर त्याचा फटका भारतीय रेल्वेला सोसावा लागला, कारण दोघांमधील भांडणामुळे रेल्वेला तीन कोटींचे नुकसान झाले आहे. यानंतर पतीला नोकरी गमवावी लागली, म्हणजेच त्याला रेल्वेने सेवेतून निलंबित केले. प्रकरण पुढे आणखी गुंतागुंतीचे होत गेले व न्यायालयापर्यंत पोहोचले. या सर्व प्रकारानंतर पतीने पत्नीपासून घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. एका ‘ओके’मधून एवढा मोठा गोंधळ कसा निर्माण झाला, हे प्रकरण अतिशय रंजक आणि आश्चर्यकारक आहे.








