
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे इथेच, दिल्लीत आहेत. ते संसदेत झालेल्या घुसखोरीविषयी सभागृहामध्ये येऊन झालेल्या घटनेबद्दल निवेदन का करत नाही? संसदेतील घुसखोरीसारख्या गंभीर बाबीवर जर पंतप्रधान बोलणार नसतील तर कोणत्या विषयावर बोलतील? पंतप्रधान मोदींनी संसदेवर बहिष्कार तर टाकलेलं नाही ना, असा संतप्त सवाल कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे. बुधवारी संसद परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.







