
cji chandrachud : भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड १० नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याकडे अवघे ५ कार्यदिवस शिल्लक असून या पाच दिवसांत ते पाच महत्वाचे निकाल देणार आहेत. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाला (एएमयू) अल्पसंख्याक संस्थेचा दर्जा देण्यासंदर्भातील वाद, मदरसा कायद्याची वैधता, मालमत्तेचे पुनर्वाटप अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर ते निर्णय देणार आहेत. निवृत्त होण्यापूर्वी सरन्यायाधीश जो निर्णय देतील, त्याचा परिणाम राजकारणावरच नव्हे, तर सर्वसामान्यांच्या जीवनावरही होणार आहे.








