
लक्ष्मीच्या पाऊलांनी
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकत आणि ६.५चा टीआरपी मिळवत या आठवड्यात तिसरं स्थान पटकावलं आहे. या आठवड्यात मालिकेत बराच गदारोळ पाहायला मिळाला आहे. कला आणि अद्वैत यांनी राहुल आणि नैनाचं लग्न व्हावं म्हणून अनेक प्रयत्न केले. मात्र, ऐन लग्नाच्यावेळी राहुल आणि त्याच्या आईने नैनाचं किडनॅप केलं. परंतु, कला आणि अद्वैत यांनी तिला शोधून काढलं आणि दोघांचं लग्न लावूनच दिलं.







